# एक सामान्य कार्यकर्तासुद्धा भाजपा मध्ये जिल्हाध्यक्ष होऊ शकतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भाजपा मोठं केल्याशिवाय राहत नाही. इथे घराणेशाही नाही. म्हणूनच रायगड जिल्ह्यात भाजपा वाढत चालली आहे. # अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनःश्च निवड.
# एक सामान्य कार्यकर्तासुद्धा भाजपा मध्ये जिल्हाध्यक्ष होऊ शकतो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भाजपा मोठं केल्याशिवाय राहत नाही. इथे घराणेशाही नाही. म्हणूनच रायगड जिल्ह्यात भाजपा वाढत चालली आहे.
# अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनःश्च निवड.
पनवेल (प्रतिनिधी)
अविनाश कोळी एक सामान्य माणूस, सामान्य पत्रकार, तर कधी RSS चा प्रामाणिक सैनिक. कुठलाही राजकीय वरदहस्त नाही. की कुठलाही मोठा धंधा नाही. साधारण पणे जिल्हाध्यक्ष पद हे 100 कार्यकर्ते मागे आणि 100 कार्यकर्ते लोंबते असलेल्या माणसाला देतात. पण तसें काही नाही. केवळ मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे मिशन फत्ते केले आहे. अनेक वर्षे भाजपा साठी त्यांनी घासली आहेत. त्या नंतर ते जिल्हाध्यक्ष पदी आले. त्यानंतर ही कसोटी असते इलेक्शनला. इलेक्शन हरले की डचू असतोस. पण त्यांनी खासदारकी आणि आमदारकी यामध्ये जान ओतली. नशिबानेही साथ दिली. एवढे कमी की काय महाबली जे. एम. म्हात्रे आणि महाबलाढ्य प्रितम जनार्दन म्हात्रे यांना सुद्धा भाजप पक्षात आणण्यात यश मिळवले. बाकी राजकारण काही असेल ते पण जिल्हाध्यक्ष तेच होते ना. त्यामुळे याचे क्रेडिट सुद्धा त्यांनाच जाते. बहुतेक सर्व विचार करून भाजपा ने उत्तर जिल्हा अध्य्यक्ष पद त्यांनाच दिले असावे. त्यांना सर्व जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!
संघटन कौशल्य, कार्यक्षमता व पक्षशिस्त म्हणून ओळखले जाणारे अविनाश कोळी यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. प्रदेश भाजपच्यावतीने आज राज्यातील जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पुनर्नियुक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही निवड अत्यंत फलदायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विविध जिल्हाध्यक्षांच्या निवड प्रक्रिया नुकतीच पार पाडली आहे. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी व स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने या निवडी करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यासाठी पक्षाने ठोस निकष निश्चित केले, त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी ६० वर्षांखालील उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले आहे. अविनाश कोळी यांचे संघटनात्मक कार्यासाठी नियोजन उत्तम प्रकारचे असते. पक्षाचे ध्येय धोरण आणि उपक्रमे नेहमीच यशस्वी करत त्यांनी यापूर्वीही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चोख पार पाडली आहे. तसेच निवडणुकाही जिंकण्यात त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबरीने संघटनात्मक जबाबदारीने काम केले आहे. त्यामुळे त्यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपने पुनर्निवड जाहीर केली आहे.
Comments
Post a Comment